शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही-राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 21:50 IST

महाराष्ट्रात चिखलातून कमळ उगवल्याप्रमाणे अनेक सुधारक झाले; परंतु आता भलतीच कमळं उगवली आहेत. देशातील खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही. हा सगळा चोरांचा बाजार

ठळक मुद्देराजू शेट्टी यांचा भाजपवर हल्लाबोल : दलालापासून राष्ट्र, राज्य वाचविले पाहिजे

कोल्हापूर : महाराष्ट्रात चिखलातून कमळ उगवल्याप्रमाणे अनेक सुधारक झाले; परंतु आता भलतीच कमळं उगवली आहेत. देशातील खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही. हा सगळा चोरांचा बाजार आहे. या दलालांपासून देश आणि महाराष्ट्र वाचविला पाहिजे, अशी घणाघाती टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी संकलित केलेल्या वह्या शेट्टी यांच्या हस्ते शुक्रवारी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. त्यावेळी शेट्टी यांनी भाजप सरकारचा पंचनामा केला. आमदार पाटील, महापौर शोभा बोंद्रे यांच्यासह कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यावेळी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, जून महिना आला की, पालकांना मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे पोटात गोळा येतो. या सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला असून, अशा परिस्थितीत सतेज पाटील यांनी संकलित केलेल्या पाच लाखांहून अधिक वह्या मुलांसाठी वाळवंटातील ओअ‍ॅसिस ठरणार आहेत.

भाजपच्या कारभारावर चौफेर टीका करताना शेट्टी म्हणाले, शाळा बंद करून सध्याच्या सरकारमध्ये असलेल्यांचा चंगळवाद पोसण्यासाठी नवे गुलाम तयार करण्याचे काम सुरू आहे. मीदेखील ‘अच्छे दिन’च्या भूलभुलय्याला भुललो होतो; परंतु ‘सर्व शिक्षा अभियान’ बंद आहे, पेयजल योजना ठप्प आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न तर ‘जैसे थे’च आहेत.

दूध दराचे हे संकट येणार, हे मी आधी दोन वर्षे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांना सांगितले होते. क्रूड आॅईलच्या किमती आवाक्यात असताना ५० रुपये वाढीव दराने पेट्रोल विकले जाते. हे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.यांचं धर्मकार्य अन् भोगतोय आम्ही !न्यूझीलंड, डेन्मार्क, आॅस्ट्रेलिया या देशांत भाकड जनावरे कत्तलखान्याला पाठविली जातात. मात्र, भारतात गोवंश हत्याबंदीचा कायदा केल्याने आम्हाला भाकड जनावरे पोसण्याची पाळी आली. सोडून दिलेली अशी हजारो जनावरे उभे पीक उद्ध्वस्त करीत आहेत. यांचे धर्मकार्य होते आणि ते मात्र आम्ही शेतकरी भोगतोय, असे शेट्टी म्हणाले. 

मी विंचू चावल्याचे सांगितलेमारुतीच्या मूर्तीच्या बेंबीत एका मुलाने हात घातला तर त्याला विंचू चावला. त्याने इतरांना मात्र आपल्याला गार लागल्याचे सांगितले. इतर मुलेही गार लागले असेच म्हणू लागली; पण मी खरे बोलणारा आहे. मला यांच्या नादाला लागून खरेच विंचू चावला आहे, असे शेट्टी यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर